AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unclaimed Bank Money : जून महिन्यात ‘लखपती’ योग! वडिलोपार्जीत संपत्ती बँका देतील परत

Unclaimed Bank Money : तुम्ही जून महिन्यात लखपती होण्याचा योग आहे. देशातील बँका तुम्हाला शोधत येत हातात पैसा टेकवतील. वडिलोपार्जीत संपत्ती असेल तर बँका त्या येत्या तीन महिन्यांत परत करणार आहेत..

Unclaimed Bank Money : जून महिन्यात 'लखपती' योग! वडिलोपार्जीत संपत्ती बँका देतील परत
| Updated on: May 30, 2023 | 11:48 AM
Share

नवी दिल्ली : जून महिन्यात लखपती होण्याचा योग जुळून येत आहे. तुमचे नशीब जोरवर असेल तर येत्या तीन महिन्यात लॉटरी लागू शकते. भारतीय बँकांमध्ये हजारो कोटी रुपये (Unclaimed Amount) पडून आहेत. ही वडीलोपार्जीत रक्कम तुम्हाला पण मिळू शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील सर्वच बँकांना 100 दिवसांत 100 दाव्यांचा निपटारा करण्यास सांगितले आहे. विविध खात्यात पडलेली ही कोट्यवधी रक्कम खातेदारांच्या वारसदारांना परत करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. जून महिन्यापासून ही मोहिम सुरु होत आहे. कुटुंब प्रमुखाच्या खात्यातील पडून असलेली ही रक्कम व्याजासहित तुम्हाला मिळेल.

35,012 कोटी रुपये पडून भारतीय बँकांमध्ये अनेक खातेदारांचा पैसा पडून आहे. खाते उघडल्यानंतर या खात्यात त्यांनी रक्कम जमा केली. काहींनी मुदत ठेव ठेवली. पुढे काही कारणाने त्याचा विसर पडला. अथवा खातेदाराचा मृत्यू झाल्यास ही रक्कम तशीच पडून राहते. देशातील अनेक बँकांमध्ये असे जवळपास 35,012 कोटी रुपये पडून आहेत. मार्च 2022 मध्ये ही रक्कम 48,262 रुपये होती.

विना दावा खात्याचं वारस कोण बरेच जण घरच्यांना न सांगता, बँकेचे खाते उघडतात. त्यात काही रक्कम ठेव ठेवतात. काही वर्ष व्यवहार केल्यानंतर या खात्यात कोणताही व्यवहार होत नाही. देशात अशी अनेक खाते निष्क्रिय आहेत. या खात्यातील मोठ्या रक्कमा तशाच पडून आहेत. खातेदार हयात नसल्याने वा खात्याचा विसर पडल्याने त्यांनी या रक्कमेवर दावा सांगितलेला नाही. दहा वर्षांत या खात्यात रक्कम टाकण्यात आली नाही अथवा रक्कम काढण्यात आली नाही तर केंद्र सरकार त्याला अनक्लेम डिपॉझिट म्हणून जाहीर करते. आता पुरावा सादर केल्यास ही रक्कम परत मागता येईल.

100 दिवसांत 100 दावे केंद्रीय बँकेने देशातील सर्वच बँकांना 100 दिवसांत 100 दावे हे अभियान सुरु करण्यास सांगितले आहे. त्यामुळे येत्या 100 दिवसांत प्रत्येक जिल्ह्यातील किमान 100 खात्यांच्या वारसदारांचा शोध घेण्यात येत आहे. या दावे न केलेल्या खात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्या वारसदारांचा शोध घेऊन त्यांना ही रक्कम परत करणे बँकांन अनिवार्य करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या वाडवडिलांची नावे आहेत का, याची माहिती घेण्यासाठी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर जावे लागेल.

कशी मिळेल रक्कम परत प्रत्येक बँकेने निष्क्रिय खात्यांची एक यादी तयारी केली आहे. ही यादी तपासण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बँकेच्या वेबसाईटवर जावे लागेल. यादीत तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव आढळल्यास संबंधित शाखेत जावे लागेल. याठिकाणी एक अर्ज भरुन द्यावा लागेल. या क्लेम फॉर्म भरुन कागदपत्रे जोडावे लागतील. यामध्ये वारस असल्याची सिद्ध करणारी कागदपत्रे लागतील. मृत खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र वा दाव्याशी संबंधीत कागदपत्रे लागतील. रक्कम मोठी असल्यास घरातील सदस्यांची ना हरकत प्रमाणपत्र लागेल. विहित प्रक्रियेनंतर वारसदाराच्या खात्यात व्याजासहित रक्कम जमा करण्यात येईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.