AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारने बांधले 1 लाख 41 हजार किमीपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग.. 2025 पर्यंत बांधायचे आहेत, दोन लाख कीलोमीटर पर्यंतचे रस्ते

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2024-25 पर्यंत दोन लाख किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या उद्दिष्टापैकी 31 मार्चपर्यंत 1,41,190 किमीचे बांधकाम पूर्ण केले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली.

केंद्र सरकारने बांधले 1 लाख 41 हजार किमीपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग.. 2025 पर्यंत बांधायचे आहेत, दोन लाख कीलोमीटर पर्यंतचे रस्ते
कोकणातील रस्ते लवकरच होणार फास्टImage Credit source: TV9
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 14, 2022 | 9:36 PM
Share

नवी दिल्लीः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2024- 25 या वर्षांपर्यंत 2 लाख कीलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधणीचे उदिद्ष्टय निश्चीत केले असून, त्यापैकी 31 मार्चपर्यंत 1, 41,190 किमी महामार्ग बांधणीचे काम पूर्ण केले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने (Ministry of Petroleum) त्याच कालावधीसाठी 34,500 किमी गॅस पाइपलाइन टाकण्याचे लक्ष्य 20,000 किमी पूर्ण केले आहे. उर्जा मंत्रालयाने मार्च 2022 अखेर 4,54,200 किमीचे ट्रान्समीशन नेटवर्क (Transmission network) टाकण्याचे उद्दिष्टही ओलांडले आहे. तसेच दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications)2024-25 या आर्थिक वर्षासाठी 50,00,000 किमी, 31 मार्च 2022 पर्यंत 33,00,997 किमीचे लक्ष्य ठेवले आहे. ऑप्टिकल फायबर केबल (OFC) नेटवर्कची स्थापना करण्यात आली आहे.

गुरूवारी झालेल्या पीएम गतिशक्तीच्या आढावा बैठकीत विविध मंत्रालयांच्या प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल होते. PM गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन (NMP) ही एकात्मिक योजना आहे, जी चांगल्या समन्वयासाठी विविध मंत्रालये/विभागांच्या सर्व विद्यमान आणि प्रस्तावित विकास उपक्रमांची माहिती ठेवते. मंत्रालयाने म्हटले आहे की, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या लॉजिस्टिक विभागातील विशेष सचिवांनी बैठकीत विविध विभागातील आतापर्यंत पार पडलेल्या कामकाजांचा आढावा सादर केला.

आतापर्यंत 10 लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी

पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत भारतात आतापर्यंत सुमारे 10 लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. त्याच वेळी, गेल्या महिन्यात भारतात एकूण 10,60,707 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती, तर 1,742 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन (PCS) देशात कार्यरत होते. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, राष्ट्रीय महामार्गावरील रोड साइड सुविधांचा (WSAs) भाग म्हणून महामार्ग विकासकाद्वारे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन प्रदान केले जातील.

चांगले रस्तेः विकासाची गुरुकिल्ली

गडकरी म्हणाले होते की, वाहन 4 च्या आकडेवारीनुसार 19 मार्चपर्यंत देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 10,60,707 आहे आणि ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) नुसार 21 मार्च 2022 पर्यंत आहेत. देशातील 1,742 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन (PCS) सद्यस्थितीत सुरू आहेत. अलीकडेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, चांगले रस्त्यांचे जाळे असणे ही विकासाची गुरुकिल्ली आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील सरकार देशभरातील रस्ते संपर्क सुधारण्यासाठी पावले उचलत आहे. रस्त्यांचे जाळे झपाट्याने बळकट केले जात असून त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत.

संबंधित बातम्या

Sandeep Deshpande : ‘शरद पवार महाराष्ट्राची माफी मागा’, मनसेची मागणी; तर ‘तुम्हालाच अनेकवेळा माफी मागावी लागेल’, गृहमंत्र्यांचा पलटवार

Ranbir Alia Wedding Photos: घरातल्या ‘त्या’ आवडत्या जागीच रणबीर-आलियाने बांधली लग्नगाठ; पहा लग्नाचे खास फोटो

tv9 Special: ‘दिलासा घोटाळा’ या नावानं उदयास आलेल्या नव्या घोटाळ्याची नेमकी व्याख्या काय?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली