केंद्र सरकारने बांधले 1 लाख 41 हजार किमीपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग.. 2025 पर्यंत बांधायचे आहेत, दोन लाख कीलोमीटर पर्यंतचे रस्ते

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2024-25 पर्यंत दोन लाख किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या उद्दिष्टापैकी 31 मार्चपर्यंत 1,41,190 किमीचे बांधकाम पूर्ण केले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली.

केंद्र सरकारने बांधले 1 लाख 41 हजार किमीपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग.. 2025 पर्यंत बांधायचे आहेत, दोन लाख कीलोमीटर पर्यंतचे रस्ते
कोकणातील रस्ते लवकरच होणार फास्टImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 9:36 PM

नवी दिल्लीः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2024- 25 या वर्षांपर्यंत 2 लाख कीलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधणीचे उदिद्ष्टय निश्चीत केले असून, त्यापैकी 31 मार्चपर्यंत 1, 41,190 किमी महामार्ग बांधणीचे काम पूर्ण केले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने (Ministry of Petroleum) त्याच कालावधीसाठी 34,500 किमी गॅस पाइपलाइन टाकण्याचे लक्ष्य 20,000 किमी पूर्ण केले आहे. उर्जा मंत्रालयाने मार्च 2022 अखेर 4,54,200 किमीचे ट्रान्समीशन नेटवर्क (Transmission network) टाकण्याचे उद्दिष्टही ओलांडले आहे. तसेच दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications)2024-25 या आर्थिक वर्षासाठी 50,00,000 किमी, 31 मार्च 2022 पर्यंत 33,00,997 किमीचे लक्ष्य ठेवले आहे. ऑप्टिकल फायबर केबल (OFC) नेटवर्कची स्थापना करण्यात आली आहे.

गुरूवारी झालेल्या पीएम गतिशक्तीच्या आढावा बैठकीत विविध मंत्रालयांच्या प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल होते. PM गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन (NMP) ही एकात्मिक योजना आहे, जी चांगल्या समन्वयासाठी विविध मंत्रालये/विभागांच्या सर्व विद्यमान आणि प्रस्तावित विकास उपक्रमांची माहिती ठेवते. मंत्रालयाने म्हटले आहे की, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या लॉजिस्टिक विभागातील विशेष सचिवांनी बैठकीत विविध विभागातील आतापर्यंत पार पडलेल्या कामकाजांचा आढावा सादर केला.

आतापर्यंत 10 लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी

पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत भारतात आतापर्यंत सुमारे 10 लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. त्याच वेळी, गेल्या महिन्यात भारतात एकूण 10,60,707 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती, तर 1,742 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन (PCS) देशात कार्यरत होते. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, राष्ट्रीय महामार्गावरील रोड साइड सुविधांचा (WSAs) भाग म्हणून महामार्ग विकासकाद्वारे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन प्रदान केले जातील.

चांगले रस्तेः विकासाची गुरुकिल्ली

गडकरी म्हणाले होते की, वाहन 4 च्या आकडेवारीनुसार 19 मार्चपर्यंत देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 10,60,707 आहे आणि ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) नुसार 21 मार्च 2022 पर्यंत आहेत. देशातील 1,742 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन (PCS) सद्यस्थितीत सुरू आहेत. अलीकडेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, चांगले रस्त्यांचे जाळे असणे ही विकासाची गुरुकिल्ली आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील सरकार देशभरातील रस्ते संपर्क सुधारण्यासाठी पावले उचलत आहे. रस्त्यांचे जाळे झपाट्याने बळकट केले जात असून त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत.

संबंधित बातम्या

Sandeep Deshpande : ‘शरद पवार महाराष्ट्राची माफी मागा’, मनसेची मागणी; तर ‘तुम्हालाच अनेकवेळा माफी मागावी लागेल’, गृहमंत्र्यांचा पलटवार

Ranbir Alia Wedding Photos: घरातल्या ‘त्या’ आवडत्या जागीच रणबीर-आलियाने बांधली लग्नगाठ; पहा लग्नाचे खास फोटो

tv9 Special: ‘दिलासा घोटाळा’ या नावानं उदयास आलेल्या नव्या घोटाळ्याची नेमकी व्याख्या काय?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.