AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राकडून दूरसंचार कंपन्यांच्या नियमांमध्ये बदल; आता दोन वर्ष करावे लागणार डेटाचे जतन

केंद्र सरकारकडून दूरसंचार कंपन्यांच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार दूरसंचार कंपन्यांना आता आपाल्याकडील डेटा आणि इटनेट वापराबाबतची माहिती दोन वर्षांसाठी जतन करून ठेवावी लागणार आहे.

केंद्राकडून दूरसंचार कंपन्यांच्या नियमांमध्ये बदल; आता दोन वर्ष करावे लागणार डेटाचे जतन
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 3:13 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून दूरसंचार कंपन्यांच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार दूरसंचार कंपन्यांना आता आपाल्याकडील डेटा आणि इटनेट वापराबाबतची माहिती दोन वर्षांसाठी जतन करून ठेवावी लागणार आहे. दूरसंचार विभागाकडून दूरसंचार कंपन्यांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. पूर्वी हा सर्व डेटा जनत करून ठेवण्याचा कालावधी एक वर्षाचा होता. हा कालावधी वाढवण्यामागे सुरक्षेचे कारण सांगण्यात आले आहे. 

काय आहे नवा आदेश

दूरसंचार विभागाने जारी केलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, यापुढे दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्याकडे असलेल्या सर्व डेटा हा दोन वर्षांसाठी जतन करून ठेवावा लागणार आहे. या डेटामध्ये इंटरनेट वापराचा इतिहास, कॉल रेकॉर्ड्स, कॉल डिटेल, एक्सचेंज डिटेल सीम नंबर अशा सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे. पूर्वी याची मर्यादा एक वर्ष इतकी होती. मात्र आता ती वाढून दोन वर्ष करण्यात आली आहे. दोन वर्षानंतर जर दूरसंचार विभागाकडून कुठलेच आदेश मिळाले नाहीत तर कंपन्या आपल्याकडील डेटा हा नष्ट करू शकतात.

जनतेच्या हितासाठी नियमांमध्ये बदल

दरम्यान हे नवे बदल जनतेच्या हितासाठी आणि सुरक्षेसाठी करण्यात आल्याचा दावा देखील दूरसंचार विभागाकडून करण्यात आला आहे. कंपन्याना देण्यात आलेल्या नव्या आदेशानुसार कंपन्यांना त्यांच्याकडील सर्व माहितीचे जनत हे  आता दोन वर्षासाठी करावे लागणार आहे. ज्यामध्ये व्यक्तीच्या इंटरनेट वापराबाबतची माहिती, सर्व कॉल डिटेल्स, इंटनेट एक्सेस, व्यक्ती वापरत असलेले सर्व प्रकारच्या अ‍ॅप्लिकेशनची नोंद ठेवणे, तसेच त्याच्या वापराबाबतचे डिडेल्स बंद झालेल्या सीम सेवेबाबतची माहिती अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. हा डेटा स्टोर करण्याचा कालावधी वाढवल्यास सायबर गुन्हेगारीला आळा घालता येऊ शकतो, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

Insurance Premium : विम्याचा हप्ता वर्षभरात दुसऱ्यांदा वाढणार, काय आहे तज्ज्ञांचं मत?

सेमीकंडक्टर समस्येचा अंत ‘वेदांत’ ! साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, अनिल अग्रवाल यांची मोठी घोषणा  

Toyota India : टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे टोयोटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार; काय आहे खास, वाचा…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.