AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेंशन योजनेमधील गुंतवणुकीत लोकांचा कल वाढला; एनपीएसमध्ये 24 टक्के वाढ

PFRDA च्या आकडेवारीनुसार, अटल पेन्शन योजनेअंतर्गत ग्राहकांची संख्या या वर्षी 31 ऑगस्ट रोजी 33.20 टक्क्यांनी वाढून 304.51 लाख झाली. व्यवस्थापनाखालील एकूण पेन्शन मालमत्ता 32.91 टक्क्यांनी वाढून ऑगस्ट 2021 च्या अखेरीस 6,47,621 कोटी रुपये झाली.

पेंशन योजनेमधील गुंतवणुकीत लोकांचा कल वाढला; एनपीएसमध्ये 24 टक्के वाढ
पेंशन योजनेमधील गुंतवणुकीत लोकांचा कल वाढला; एनपीएसमध्ये 24 टक्के वाढ
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 4:23 PM
Share

नवी दिल्ली : पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी(PFRDA)च्या प्रमुख पेन्शन योजनांच्या अंतर्गत ग्राहकांची संख्या या वर्षी ऑगस्टमध्ये 24 टक्क्यांनी वाढून 4.53 कोटी झाली आहे. पीएफआरडीएने शुक्रवारी एका निवेदनात ही माहिती दिली. पीएफआरडीए दोन पेन्शन योजना चालवते- राष्ट्रीय पेन्शन प्रणाली(National Pension System) आणि अटल पेन्शन योजना(Atal Pension Yojana). (The trend in investing in pension schemes has increased; 24 per cent increase in NPS)

निवेदनानुसार, राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत ग्राहकांची संख्या दरवर्षी 24.06 टक्क्यांनी वाढून या वर्षी ऑगस्ट महिन्यात 453.41 लाख झाली. तसेच, ऑगस्ट 2020 मध्ये ते 365.47 लाख होते. PFRDA च्या आकडेवारीनुसार, अटल पेन्शन योजनेअंतर्गत ग्राहकांची संख्या या वर्षी 31 ऑगस्ट रोजी 33.20 टक्क्यांनी वाढून 304.51 लाख झाली. व्यवस्थापनाखालील एकूण पेन्शन मालमत्ता 32.91 टक्क्यांनी वाढून ऑगस्ट 2021 च्या अखेरीस 6,47,621 कोटी रुपये झाली. यापैकी अटल पेन्शन योजनेअंतर्गत व्यवस्थापनाखालील मालमत्ता 18,059 कोटी रुपये होती, जी एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 33 टक्के अधिक आहे.

संघटित क्षेत्रातील कर्मचारी एनपीएसशी जोडलेत

संघटित क्षेत्रातील कर्मचारी प्रामुख्याने NPS शी संबंधित असतात. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, स्वायत्त संस्था, खाजगी कंपन्यांचे कर्मचारी आणि इतरांचा समावेश आहे. तसेच, अटल पेन्शन योजनेचे ध्येय मुख्यतः असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेच्या कक्षेत आणणे आहे.

अटल पेन्शन योजना काय आहे?

अटल पेन्शन योजना भारत सरकारने मे 2015 मध्ये सुरू केली होती. 18 ते 40 वयोगटातील सर्व नागरिक या योजनेचा भाग बनू शकतात. या योजनेअंतर्गत, ग्राहकाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या योगदानावर अवलंबून 1,000 ते 5,000 रुपये मासिक पेन्शनची हमी दिली जाते.

कमाल वयोमर्यादा 70 वर्षे केली

राष्ट्रीय पेन्शन योजना अधिक आकर्षक करण्यासाठी पीएफआरडीएने आपले काही नियम शिथिल केले आहेत. NPS मध्ये सामील होण्याचे वय 65 वरून 70 वर्षे करण्यात आले आहे. यासह, पीएफआरडीएने एनपीएस योजनेतील प्रवेश आणि निर्गमन नियमांमध्ये सुधारणा केली आहे. NPS मध्ये प्रवेशाचे वय 18-65 वरून 18-70 करण्यात आले आहे. पूर्वी 18 ते 65 वर्षे वयाचे लोक NPS मध्ये सामील होऊ शकत होते. आता ही वयोमर्यादा 18 वरून 70 वर्षे करण्यात आली आहे. 70 वर्षांमध्ये NPS मध्ये सामील होऊन, खातेदार 75 वर्षे राहू शकतो.

50 टक्केपर्यंत इक्विटीमध्ये ठेव शक्य

65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ग्राहक आता NPS अंतर्गत पेन्शन फंडाच्या 50 टक्के रक्कम इक्विटी किंवा शेअर्समध्ये जमा करू शकतील. यामुळे पेन्शनची रक्कम वाढेल आणि निवृत्तीनंतर अधिक पैसे मिळतील. (The trend in investing in pension schemes has increased; 24 per cent increase in NPS)

इतर बातम्या

अंजीर शेती : अंजीरची लागवडीपासून ते बाजारपेठपर्यंतची सर्व माहिती

‘मातोश्री’ समोरच पूल कोसळला, अपयश लपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं ते विधान; नितेश राणेंची टीका

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.