AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कंपनीचा सॅलरी पॉलिसीसंदर्भात मोठा निर्णय, आता कर्मचाऱ्यांना मिळणार दर आठवड्याला पगार

पगार ( Salary) हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय असतो मग ती कंपनी कोणतीही असो, भारतासह जगभरात दर महिन्याला कर्मचाऱ्याला त्याच्या कामाचा पगार किंवा मोबदला देण्याची प्रथा आहे. त्यामुळे दर महिन्याच्या शेवटी कर्मचारी हा आपल्या पगाराची अतुरतेने वाट पहात असतो.

'या' कंपनीचा सॅलरी पॉलिसीसंदर्भात मोठा निर्णय, आता कर्मचाऱ्यांना मिळणार दर आठवड्याला पगार
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 5:30 PM
Share

पगार ( Salary) हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय असतो मग ती कंपनी कोणतीही असो, भारतासह जगभरात दर महिन्याला कर्मचाऱ्याला त्याच्या कामाचा पगार किंवा मोबदला देण्याची प्रथा आहे. त्यामुळे दर महिन्याच्या शेवटी कर्मचारी हा आपल्या पगाराची अतुरतेने वाट पहात असतो. मात्र तुम्हाला जर महिन्याऐवजी दर आठवड्याला पगार मिळाला तर थोडे विचित्र वाटत आहेना?, पण हे खरं आहे. इंडियामार्ट (Indiamart) या ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या पद्धतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या निर्णनयानुसार या कर्मचाऱ्यांना आता आपल्या पगारासाठी महिन्याच्या पहिल्या तारखीची वाट पहावी लागणार नाहीये. तर या कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पगार (Weekly Salary Pay Policy) मिळणार आहे. कंपनीकडून त्यांच्या अधिकृत फेसबूक पेजवर याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना महिन्याऐवजी जर दर आठवड्याला पगार दिल्यास त्यांच्या आर्थिक समस्या काही प्रमाणात कमी होतील असे या कंपनीने म्हटले आहे.

‘या’ देशातील कंपन्याही देतात दर आठवड्याला पगार

कंपनीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, कामाच्या स्वरूपात लवचिकता येण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी कंपनीने आता कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला करण्याऐवजी दर आठवड्याला करण्याचा निर्णय घेतला आहे. इथून पुढे कर्मचाऱ्यांचा पगार हा दर आठवड्याला करण्यात येईल. कंपनीचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी चांगला असल्याचे बोलले जात आहे. भारतासह जगात जवळपास सर्वच कंपन्यांची सॅलरी पॉलिसी ही सारखीच आहे. कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या शेवटी किंवा एक तारखेला पेमेंट देतात. मात्र न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, हॉगंकॉंग आणि यूएसमध्ये अशा देखील काही कंपन्या आहेत, त्यांनी यापूर्वीच आपल्या कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

14.3 कोटी ग्राहक

इंडियामार्ट ही मार्केटिंग क्षेत्रातील एक आग्रण्य कंपनी आहे. ही कंपनी बायर्स आणि सेलर्समधील दुवा म्हणून काम करते. या कंपनीची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली होती. खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामधील एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करण्याच्या उद्देशाने या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. उपलब्ध असेलेल्या डेटानुसार या कंपनीसोबत 14.3 कोटी खरेदीदार तर 70 लाख विक्रेते जोडले गेलेले आहेत.

संबंधित बातम्या

ओवरड्रॉफ्ट सुविधेद्वारे होम लोनचे ओझे कमी करा, जाणून घ्या फायदे

‘या’ चार बँकांनी केलेत त्यांच्या नियमावलीत बदल, खातेधारकांनी जाणून घेणे महत्त्वाचे…

तेलाचे दर घसरले, अंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्याचा परिणाम, ग्राहकांना दिलासा

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.