AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar Card : आधार कार्डसंबंधी सरकारने घेतला हा मोठा निर्णय, तयारी ही झाली पूर्ण

Aadhaar Card : आधार कार्ड अपडेटविषयी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे..

Aadhaar Card : आधार कार्डसंबंधी सरकारने घेतला हा मोठा निर्णय, तयारी ही झाली पूर्ण
आधार कार्ड अपडेट आवश्यकImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 21, 2022 | 9:19 PM
Share

नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhaar Card Update) हे सध्या सर्वात महत्वाचे कागदपत्रे झाले आहे. सध्या बँक खाते असू द्या की पहिला गॅस सिलिंडरचे घ्यायचे असू द्या यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डची आवश्यकता लक्षात घेता, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक मोठा निर्णय घेतला आहे.

UIDAI नुसार, सर्व राज्यांना आधार कार्डच्या सेवेचा परीघ वाढविण्याची माहिती देण्यात आली आहे. UIDAI ने सर्व नागरिकांचे आधार कार्ड दर 10 वर्षांनी अद्ययावत (Update) करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर 10 वर्षांनी नागरिकांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे.

नागरिकांना बायोमॅट्रिक डाटा अद्ययावत करावा लागणार आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणांना काम करावे लागणार आहे. त्यांना नागरिकांना याविषयीची माहिती द्यावी लागणार आहे.

प्रशासकिय यंत्रणेला यासाठी लवकरच कामाला लावले जाणार असले तरी नागरिकांवर बायोमॅट्रिक अपडेटसाठी कुठलेही बंधन आणण्यात येणार नाही. ही संपूर्णतः ऐच्छिक बाब असेल. परंतु, योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड अपडेट ठेवावे लागेल.

आधार कार्ड अपडेट केल्यामुळे बोगस आधार कार्डला आळा बसेल असा विश्वास UIDAI ला आहे. यासंबंधीची अधिसूचना प्राधिकरणाने काढली आहे. प्रत्येक नागरिक आता दहा वर्षांनी त्याची बायोमॅट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती अद्ययावत करु शकतो, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

आधार कार्ड सतत अपडेट ठेवणे हे केवायसीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसेच अनेक योजनांसाठी अद्ययावत आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डमधील माहिती एकदम योग्य असणे आवश्यक आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.