AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नववर्षाच्या स्वागताला काश्मीरला जायचंय?, चिंता सोडा पटापट बॅग भरा, आयआरसीटीसीकडून मिळतीये खास ऑफर

नवीन वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण बाहेरगावी जाण्याचा प्लॅन बनवत असतात. विशेष म्हणजे नव्या वर्षाची सुरुवातच विकेंडने होत आहे. त्यामुळे  तुम्हाला आणखी काही जादा सुट्या मिळू शकतात.

नववर्षाच्या स्वागताला काश्मीरला जायचंय?, चिंता सोडा पटापट बॅग भरा, आयआरसीटीसीकडून मिळतीये खास ऑफर
irctc
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 1:59 PM
Share

नवी दिल्ली : नवीन वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण बाहेरगावी जाण्याचा प्लॅन बनवत असतात. विशेष म्हणजे नव्या वर्षाची सुरुवातच विकेंडने होत आहे. त्यामुळे  तुम्हाला आणखी काही जादा सुट्या मिळू शकतात. तुम्ही यावर्षी नव वर्षाच्या स्वागतासाठी काश्मीरला जाऊ शकता. काश्मीर हे सुरुवातीपासूनच पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. काश्मीरमधील थंड हवेचे ठिकाणं, पडणारा बर्फ, सरोवरे हे सर्व पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. जर नव वर्षाच्या सुरुवातीलाच काश्मीरला जाण्याची संधी मिळाली तर सोनेपे सुहागा असतो. अशीच संधी पर्यटकांना आता आयआरसीटीसीने उपलब्ध करून दिली आहे. पर्यटकांना काश्मीरसाठी आयआरसीटीसीकडून खास ऑफर देण्यात आली आहे. तुम्ही देखील या ऑफरचा लाभ घेऊन, अगदी स्वस्तात काश्मीरच्या पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.  

रायपूरमधून होणार सुरुवात

काश्मीरच्या या टूरची सुरुवात छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरच्या विमानतळावरून होणार आहे. प्रवाशी रायपूरवरून विमानाने दिल्ली विमानतळावर उतरतील. त्यानंतर ते दिल्ली विमानतळावरून श्रीनगरला जाण्यासाठी कनेक्टिंग फ्लईटमध्ये बसतील. श्रीनगरला पोहोचल्यानंतर तिथे असलेल्या हॉटेलमध्ये पर्यटकांच्या रात्रीच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.  दुसऱ्या दिवशी सकाळीच पर्यटक पर्यटनासाठी पहलगामला रवाना होतील. रस्त्यात येणाऱ्या सर्व पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन या यात्रेमध्ये करण्यात आले आहे.

‘टूरला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद ‘

दरम्यान दुसऱ्या दिवसी सोनमार्गच्या पर्यटनाचे नियोजन आहे. या भागात पर्यटक जंगल, बर्फाच्छिद डोंगर आणि इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. दरम्यान संध्याकाळी पर्यटकांना पुन्हा श्रीनगरला आणण्यात येतील. तीसऱ्या दिवशी श्रीनगरमधील पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. या पर्यटनादरम्यान प्रवाशांच्या राहण्या, खाण्याची सर्व व्यवस्था ही आयआरसीटीसीच्या वतीनेच करण्यात येणार आहे. आयआरसीटीसीची ही टूर पर्यटकांच्या बजेटमध्ये असल्याने पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 400 अकांची घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वाढली; वर्षभरात 24 टक्क्यांची वाढ, ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

Income Tax Return Filing : आतापर्यंत 4.43 कोटींपेक्षा अधिक आयकर रिटर्न दाखल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.