AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Train मध्ये तुमच्या सीटवर दुसऱ्यानेच केला कब्जा? मग आता काय करणार

Indian Railway | अनेकदा रेल्वेतून प्रवास करताना आरक्षीत आसनावरुन भांडण होताना आपण पाहिले असेल. अनेकदा काही प्रवासी दांडगाई करतात. ज्यांनी अगोदरच सीट आरक्षीत केले आहे. त्यांना ते बसू देत नाहीत. दूरचा प्रवास उभ्याने करायचा असेल तर मग रेल्वे रिझर्व्हेशनचा अर्थ तरी काय उरतो? नाही का?

Train मध्ये तुमच्या सीटवर दुसऱ्यानेच केला कब्जा? मग आता काय करणार
Image Credit source: गुगल
| Updated on: Jan 16, 2024 | 3:31 PM
Share

नवी दिल्ली | 16 जानेवारी 2024 : भारतीय रेल्वेतून रोज जवळपास 2 कोटी प्रवासी प्रवास करतात. त्यातील जास्तीत जास्त प्रवाशी हे स्लीपर अथवा जनरल क्लासमधून प्रवास करतात. एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जवळपास 8.50 लाख इतकी आहे. बऱ्याचदा स्लीपर आणि एसी कोचमध्ये विना तिकीट कित्येकदा प्रवाशी थेट प्रवास करतात. त्यावेळी या कोचमध्ये गर्दी होते. या गर्दीमुळे आरक्षण केलेले प्रवासी त्यांच्या सीटपर्यंत पण पोहचू शकत नाहीत. काही पॅसेंजर या आरक्षीत सीटवर कब्जा करतात. ते त्या जागेवरुन हटत नाहीत. अशावेळी भांडण, मारामारी करण्यापेक्षा पण काही प्रभावी उपाय आहेत.

तर दंडाची तरतूद

रेल्वेचे डीजी (पीआयबी) योगेश बावेजा यांच्या माहितीनुसार, जर एखादा प्रवासी त्याची कोच सोडून भलत्याच कोचमध्ये प्रवास करताना आढळला आणि त्याला समाजवून पण त्याने ऐकले नाही तर त्याला दंड सोसावा लागतो. तुमच्या सीटवर दुसरीच कोणती व्यक्ती बसली आणि ती सीट सोडण्यास तयार नसेल तर सर्वात अगोदर TTE ला तुम्ही तक्रार करु शकता. त्याच्याशी वाद घालण्यापूर्वी टीटीईला तक्रार करा.

अशी करा तक्रार

एसी कोचमध्ये तीन कोचवर एक टीटीई असतो. जर टीटीई दिसला नाही तर तुम्ही ट्रेन सुपरीटेंडेंसकडे तक्रार दाखल करु शकता. टीएसची सीट पेंट्रीकारमध्ये असते. तुम्ही ट्रेनमधील आरपीएफ जवानाकडे पण यासंबंधीची तक्रार करु शकता. तुम्ही टीटी, टीएस अथवा आरपीएफ जवानांकडे तक्रार केल्यावर, तुम्हाला आरक्षीत आसन मिळवून देण्याची त्यांची जबाबदारी असते.

या क्रमांकावर करा तक्रार

तुम्हाला टीटी, टीएस वा आरपीएफ जवान नाही दिसला. अथवा त्यांच्याकडून मदत झाली नाही तर, कंट्रोल रुमच्या 182 क्रमांकावर कॉल करु शकता. त्यावेळी तक्रार करता येईल. याशिवाय तुम्ही रेल्वेचा हेल्पलाईन क्रमांक 139 वर पण कॉल करु शकता. ही रेल्वेशी संबंधित अनेक प्रकारच्या सेवासंबंधीची एक कॉमन हेल्पलाईन क्रमांक आहे.

रेल मददची पण घ्या मदत

तुम्ही रेल्वेच्या अधिकृत Rail Madad एपवर पण सीट न मिळण्याची तक्रार दाखल करु शकता. याशिवाय तुम्हील रेल्वेच्या एक्स हँडलवर ट्वीट करु शकता. जेव्हा तुम्ही रेल्वेच्या ट्विटर हँडल अथवा कंट्रोल रुममध्ये तक्रार दाखल करता. तेव्हा तिथला कर्मचारी तुमच्या पीएनआर क्रमांकावरुन ट्रेनचे लोकेशन ट्रॅक करतो आणि त्यानंतर रेल्वेतील संबंधित विभागाकडे ही तक्रार पाठविण्यात येते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.