AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये फसवणूक झाल्यास काय करावे? जाणून घ्या तक्रार करण्याची प्रक्रिया

पोस्ट ऑफिसमध्ये यापूर्वी कोणताही महत्त्वाचा आणि विशेष मार्ग नव्हता, परंतु आता या तक्रारीसाठी स्वतंत्र चॅनेल बनविण्यात आले आहे, जेणेकरून काही समस्या असल्यास आपण तक्रार करू शकता. (What to do in case of fraud in post office like bank, know the process of reporting)

बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये फसवणूक झाल्यास काय करावे? जाणून घ्या तक्रार करण्याची प्रक्रिया
बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये फसवणूक झाल्यास काय करावे?
| Updated on: Jul 02, 2021 | 3:30 PM
Share

नवी दिल्ली : आजकाल लोक आपले पैसे बचत करण्यासाठी पोस्ट ऑफिसची मदत घेत आहेत. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना बँकेपेक्षा चांगले उत्पन्न मिळत आहे, त्यामुळे बरेच लोक पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करीत आहेत. पोस्ट ऑफिसमधील योजनांमध्ये ग्राहकांची संख्या वाढत असताना, पोस्ट ऑफिसमध्येही फसवणुकीची प्रकरणे उघडकीस येत आहेत, जसे बँकेत फसवणूक होते. बँकेतील वाढत्या फसवणुकीमुळे बँकांकडून बरीच महत्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत आणि फसवणूक संबंधित तक्रारींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. (What to do in case of fraud in post office like bank, know the process of reporting)

तुम्हाला बँकेच्या यंत्रणेबद्दल खूप चांगले माहिती असेलच, परंतु पोस्ट ऑफिस योजनेत फसवणूक झाल्यास तुम्हाला काय करावे लागेल हे आपल्याला माहिती आहे का? वास्तविक, पोस्ट ऑफिसमध्ये यापूर्वी कोणताही महत्त्वाचा आणि विशेष मार्ग नव्हता, परंतु आता या तक्रारीसाठी स्वतंत्र चॅनेल बनविण्यात आले आहे, जेणेकरून काही समस्या असल्यास आपण तक्रार करू शकता. अशा परिस्थितीत, फसवणूक संबंधित तक्रारींच्या निराकरणासाठी पोस्ट ऑफिसने काय व्यवस्था केली आहे.

बचत योजनांमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या विल्हेवाट लावण्यासाठी नुकताच पेस्ट ऑफिसने एसओपी जारी केला होता. यापूर्वी पोस्ट ऑफिसमध्ये फसवणुकीचा दावा करण्यासाठी कोणतीही प्रमाणित प्रक्रिया नव्हती. तथापि, आता बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये तक्रार करता येईल.

तक्रार कशी करायची?

पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या परिपत्रकानुसार कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसच्या शाखेत जाऊन दावा दाखल करू शकते. या व्यतिरिक्त ग्राहक ईमेल, स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टच्या माध्यमातून तक्रारी पाठवू शकतात. परंतु, ज्याप्रमाणे बँकेत कोणताही घोटाळा झाल्यानंतर तीन दिवसांत तक्रार करावी लागते, तसा पोस्ट ऑफिसमध्ये कोणताही विशेष नियम आणि वेळ मर्यादा नाही.

काय आहे तक्रार प्रक्रिया?

– यासाठी, आपल्याला प्रथम क्लेम फॉर्म भरावा लागेल, जो पोस्ट विभागाने जारी केला आहे. किसान विकास पत्र, एनएससी, मनी ऑर्डर इत्यादी संबंधित तक्रारी या फॉर्मद्वारे करता येतील.

– या फॉर्मसह, आपल्याला फोटो आयडी आणि पत्ता आयडी देखील द्यावा लागेल. यासह, या आयडीला सेल्फ अटेस्टेड करणे देखील आवश्यक असेल.

– तक्रार अर्जासोबत पासबुक, प्रमाणपत्र, ठेवीची पावतीही द्यावी लागेल. तसेच, जर आपण एखाद्या दाव्यासाठी पोस्ट ऑफिसला जात असाल तर तुम्हाला मूळ कागदपत्रही तुमच्या बरोबर घ्यावा लागतील, ज्याची पडताळणी पोस्ट ऑफिसमध्ये करावी लागेल.

– यानंतर तक्रार दिल्यानंतर त्यावर 7 दिवसांत कार्यवाही करणे आवश्यक असून प्रभाग अधिकाऱ्यास दहा दिवसांत त्याविषयी माहिती द्यावी लागते. (What to do in case of fraud in post office like bank, know the process of reporting)

इतर बातम्या

Cinema Censorship | फरहान अख्तर, अनुराग कश्यपसह 1400 कलाकार सेन्सॉरशिप कायद्याच्या विरोधात, दाखल केली याचिका!

राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार, तिन्ही पक्षांची हिच भूमिका: नवाब मलिक

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.