उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची थोड्या वेळातच बैठक होणार आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक शिवसेना भवनात होणार आहे. “बंडावेळी दगाफटका झाला असता तर शहीद होण्याचाच धोका होता,” असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. “उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलं, त्याचं फळ त्यांना मिळालं”, अशा शब्दांत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी निशाणा साधला. यांसह इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहुयात 4 मिनिटं 24 हेडलाईन्समध्ये..