सर्वत्र कोरोना संसर्गाची दाहकता वाढली आहे. या काळात तब्बल दीड वर्षानंतर मी घराबाहेर पडले आहे. ही कोरोनाची काळ कोठडी आहे. मी आता लोणावळ्यात राहतेय, मुंबईमध्ये नाही. लवकरच परत मुंबईला जाणार आहे, असं त्या म्हणाल्या. मी भाषण देणारी बाई नाही, आता जी माणसं भाषण देऊन गेली, ती भाषणातील थोर माणसं आहेत. सगळीकडे उभं राहून ते भाषण देऊ शकतात, असं त्या म्हणाल्या. मराठी लेखकांनी माझं आयुष्य समृद्ध केलं, तुमच्या चरणावर 1 लाख एक रुपये अर्पण करते, असं म्हणत त्यांनी बाबासाहेबांनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.