औरंगाबादः औरंगाबादच्या सभेनंतर अद्याप राज ठाकरेंवर (Raj Thackeray) गुन्हा दाखल झालेला नाही. राज ठाकरे यांना वेगळे नियम असतील.. त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर लिहून घ्या… त्याच मैदानावर त्यापेक्षा जास्त गर्दी जमवून..आणखी चांगली भाषा वापरून सभा घेईन.. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही तर माझ्यावरही कुणी कारवाई करु शकणार नाही, अशा कडक शब्दात खासदार इम्तियाज जलील (Imtiazz Jaleel) यांनी पोलिसांना इशारा दिला आहे. औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांनी (Aurangabad police) काही नियम आणि अटींचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापैकी काही नियमांचं त्यांनी उल्लंघन केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून सभेच्या काळातील संपूर्ण डेटाचा अभ्यास करण्यात येत आहे. मात्र अद्याप राज ठाकरे यांच्याविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. यावर संताप व्यक्त करताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा इशारा दिला आहे.