VIDEO : वादळ असो ,पूर असो किंवा असो पाऊस, लगीन तर होणारच, औरंगाबादच्या पठ्ठ्याचा प्रवास बघा

| Updated on: Sep 01, 2021 | 5:05 PM

औरंगाबाद, जळगवाला गेल्या दोन दिवसापासून पावसाने झोडपलं. वादळ असो ,पूर असो किंवा असो पाऊस, लगीन तर होणारच, असा चंग एका पठ्ठ्याने बांधल्याचं दिसून आलं. औरंगाबाद जिल्ह्यातील नवरदेवाला लग्नस्थळी पोहोचण्यासाठी वऱ्हाडीसोबत भयानक प्रवास करावा लागला.

Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद, जळगवाला गेल्या दोन दिवसापासून पावसाने झोडपलं. वादळ असो ,पूर असो किंवा असो पाऊस, लगीन तर होणारच, असा चंग एका पठ्ठ्याने बांधल्याचं दिसून आलं. औरंगाबाद जिल्ह्यातील नवरदेवाला लग्नस्थळी पोहोचण्यासाठी वऱ्हाडीसोबत भयानक प्रवास करावा लागला. नवरदेवासह वऱ्हाडी पुराच्या पाण्यातून चिखलातून, शेतातून, गाळातून निघाले. नवरदेव अमोल राठोडचे हे अविस्मरणीय लग्न ठरलं. लग्नाला जाण्यासाठी प्रत्येकाचं हाल झालं. पोरांची लग्न राहिलेत आता तरी रस्ता नीट करा अशी मागणी नवरदेवाने शासनाकडे केली.