औरंगाबादः शहरातील पाणी प्रश्नानं (Water Issue) अधिकच गंभीर रुप धारण केलं असल्याने भाजपतर्फे सत्ताधारी शिवसनेला (Shiv Sena) आणि राज्य सरकारमधील महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धरण्यासाठी आज विराट मोर्चा काढण्यात आला. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. पैठण गेट परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात पाणी समस्येनं त्रस्त असलेल्या महिला व पुरुषांनी सहभागी होण्याचं आवाहन भाजपतर्फे करण्यात आलं होतं. नेमक्या काय समस्या आहेत या लोकांच्या पाण्याबाबत जाणून घेऊया…