AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरीबाची पोरगी गेली तर पयाली अन् श्रीमंताची गेली तर Love Marriage? गुवाहटीला जाण्याचं समर्थन बच्चू कडूंनी कसं केलं…

आम्ही गुवाहटीला गेलो, यात फार काही वेगळं केलं नाही, असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं. 

गरीबाची पोरगी गेली तर पयाली अन् श्रीमंताची गेली तर Love Marriage? गुवाहटीला जाण्याचं समर्थन बच्चू कडूंनी कसं केलं...
| Updated on: Nov 01, 2022 | 3:22 PM
Share

अमरावतीः गुवाहटीला (Guwahati) जाणारे आमदार म्हणजे पैसे खाणारे आमदार असे आरोप वारंवार केले जात आहेत. हे आरोप मोडून काढताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी याआधी महाराष्ट्रात तसेच देशात कशी बंडखोरी (Rebel) झाली, कसे उठाव झाले, याचे दाखले दिले. अमरावतीत आमदार प्रहार जनशक्ती संघटनेच्या भव्य मेळाव्याला आमदार बच्चू कडू यांनी संबोधित केलं.

भाजप आमदार रवी राणा यांच्या खोक्यांच्या आरोपांमुळे कार्यकर्ते आणि स्वतः बच्चू कडू दुखावले असून तो राग व्यक्त करण्यासाठी हे शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. भाषणादरम्यान बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्ष किती खस्ता खास पुढे आला. एका लहानशा कार्यालयापासून पक्षाची इमारत कशी उभी राहिली, याचा इतिहास सांगितला.

अंधांचे हात बनलो, अपंगांचे पाय बनलो आणि हळू हळू जनतेचा प्रतिनिधी म्हणून उभा राहिलो. याच पक्षानं शिंदेंसोबत जायचं ठरवल्यावर त्यांच्यावर आरोप केले जातात, हे चुकीचं असल्याची भूमिका बच्चू क़डू यांनी मांडली. ते म्हणाले, ‘ तत्व पाळत बसलो आणि काहीच ताकद लावली नाही, असं नाही. राजकारणात हे करावंच लागलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही केलं होतं. त्या वेळी काँग्रेस हे जळतं घर आहे, काँग्रेससोबत मैत्र म्हणजे मुंगूस आणि सापाची मैत्री म्हटलं जात होतं. पण बाबासाहेबांचं तत्त्व महत्त्वाचं होतं. राजकारणाचं तत्त्व महत्त्वाचं आहे. शेवटच्या घटकाच्या स्वातंत्र्यासाठी जळत्या घराशी मैत्री केली. संविधान समिती स्थापन केली आणि घटनेसारखं मोठं शस्त्र तुमच्या हाती दिलं… हा दाखला बच्चू कडू यांनी दिला.

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘ निर्णय कडू असतो, काम गोड करता आला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी किती डाव तह केले. रयतेचं राज्य अधिक मजबूत करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या पिकाना शत्रूचा हात लागता कामा नये, यासाठी छत्रपतींनी आपली तलवार म्यानेतून बाहेर काढली पण अनेकांशी तडजोडी केल्या. याला काय बंडखोरी म्हणायची?’

‘शरद पवारांनी 2014मध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. तो त्यांच्या सोयीचा होता. पण ते म्हणतात ना… गरीबाची पोरगी पळून गेली तर पयाली.. .अन् श्रीमंताची गेली तर लव्ह मॅरेज होतं..’

आमचा लहान पक्ष आहे. छोटे है लेकिन दिलदार आहे. नाव बच्चू जरू असेल, आडनाव कडू असलं तरी एवढा गोड आहे… कितीही खाल्लं तरी शूगर नाही… म्हणून हे परिवर्तन चालत राहतं… आम्ही गुवाहटीला गेलो, यात फार काही वेगळं केलं नाही, असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं.

Follow Us
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.