एकीकडे राज्यात शिवसेना भाजप युतीची चर्चा जोरात सुरू असताना औरंगाबाद शहरात मात्र भाजपकडून भाजप सेना युतीचे स्पष्ट संकेत भाजपकडूनच धुडकावून लावण्यात आले आहेत. भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी महापालिका निवडणुकीत आम्हाला युती करायची नाही उलट 115 जागा भाजप या स्वबळावर लढणार आहे आणि या शहरात भाजपचा महापौर बसवणार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे युतीसाठी उत्सुक असलेल्या स्थानिक शिवसेना नेत्यांची पंचायत झाली आहे.