शिर्डी : ओबीसी आरक्षणावरूनही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे. मराठा आरक्षणाप्रमाणे ओबीसी आरक्षण राज्य सरकारने घालवलंय. सरकारने डेटा गोळा केला नाही, मागासवर्ग आयोगाची स्थापना केली नाही. सरकार आरक्षणाबाबत सरकार गंभीर नव्हतं. ओबीसीचा प्रश्न पुढे करून मराठा आरक्षण घालवलं हे सरकारचं पाप असून कोर्टाने दिलेला निर्णय आता मानावाच लागेल. मात्र आरक्षण घालवल्याची जबाबदारी राज्य सरकारला घ्यावी असेही विखे पाटील म्हणाले.