C.R. Patil : छत्रपती शिवाजी महाराजही पाटीदार…. भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग
केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे असल्याचे वक्तव्य केले आहे. यावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल करत, शिवाजी महाराजांना जात लावू नका असे म्हटले. तर, नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार केला. मंत्री आशिष शेलार यांनी मात्र कोणत्याही महापुरुषाला जात लावणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे असल्याचे वक्तव्य केले. गुजरातचे भाजप नेते असलेल्या पाटलांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. विशेषतः पालिका निवडणुकांचे रणकंदन सुरू असताना हे वक्तव्य आले. या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, भाजपने अनेक युगपुरुष पळवण्याचा प्रयत्न केला असून, आता ते शिवाजी महाराजांना गुजरातला पळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र, मराठी माणूस आणि हिंदवी स्वराज्याचे दैवत संबोधले. त्यांनी भाजप नेत्यांना शिवाजी महाराजांना जात न लावण्याचे आवाहन करत ते विश्वपुरुष असल्याचे म्हटले. दरम्यान, नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर पलटवार करत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खान जास्त प्रिय असल्याचे म्हटले. मंत्री आशिष शेलार यांनी सी. आर. पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे आहेत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत. कोणत्याही महापुरुषाला जात लावणे हे अयोग्यच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून
