मुंबई: “आज मोर्चा का काढलाय हे भाजपाच्या (BJP) कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं. उगाच इथे गर्दी करायला बोलावलेलं नाही” असं नितेश राणे यांनी सांगितलं. “आपल्याला विधानसभेत बसलेले महाविकास आघाडीचे (Mva Govt) सगळे मंत्री, घरातून न निघालेले मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीवर नागासारखे बसलेले शरद पवार (Sharad pawar) यांच्यापर्यंत संदेश पोहोचवायचा आहे. तुम्ही आमच्या मुंबईकडे वाकड्या नजरेने पहाल, तर भाजपाचे कार्यकर्ते तुम्हाला फिरु देणार नाही, हा संदेश देण्यासाठी हा मोर्चा काढला आहे”असे आमदार नितेश राणे म्हणाले.