Uday Samant | लसीकरण पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये उघडणे शक्य नाही : उदय सामंत

| Updated on: Jun 30, 2021 | 10:01 PM

लसीकरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये सुरु करणे शक्य नसल्याचं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. ते जालन्यात बोलत होते. त्याचबरोबर 3 हजार 74 पदांची भरती पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचंही सामंत म्हणाले.

Follow us on

लसीकरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये सुरु करणे शक्य नसल्याचं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. ते जालन्यात बोलत होते. त्याचबरोबर 3 हजार 74 पदांची भरती पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचंही सामंत म्हणाले. ही भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं. संवर्गानुसार भरती करायची असेल तर आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागांनी निर्णय कळवल्यास त्यानुसार भारती करण्यास तयार असल्याचंही उदय सामंत म्हणाले. संस्थांच्या रोस्टर पद्धतीने निर्णय घेतला तर भरती प्रक्रिया लांबली जाऊ शकते, अशी शक्यताही सामंत यांनी व्यक्त केलीय.