बारसूमध्ये रिफायनरी झाली पाहिजे याच्या समर्थनात एक शिष्टमंडळ भेटले. राजापूर तालुक्यातील शंभरपेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा ठराव बारसूमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी भेट घेतली आहे. त्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना त्यासंदर्भात भेटणार आहेत. तसेच जे समर्थनात असणारे नागरिक मला भेटले आहेत,त्यांची काय म्हणणे त्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती देणार आहे. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना रिफायनरी व्हावी अशी ज्यांची मागणी आहे त्यांचे मतही मुख्यमंत्र्यांना सांगितले जाणार असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.