निवडणूक आयोग एवढा पगार कसला घेतात? उद्धव ठाकरेंचा संताप
मतदानाला सुरूवात झाल्यापासून EVM मशीन बंद पडण्याचा आणि बोटावरील शाई पुसण्याचा एकच गोंधळ पहायला मिळत आहे. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एवढा गोंधळ जर या निवडणुकीत होतोय तर निवडणूक आयोग पगार कसला घेतात? असा सवाल ठाकरेंनी उपस्थीत केलाय
देशातील लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मतदान करा, असं आवाहन शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी मतदारांना केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज वांद्रे येथे सपत्नीक मतदान केलं. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं आहे. राज्यात सगळीकडे मतदार मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहेत. मात्र मतदानाला सुरूवात झाल्यापासून EVM मशीन बंद पडण्याचा आणि बोटावरील शाई पुसण्याचा एकच गोंधळ पहायला मिळत आहे. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एवढा गोंधळ जर या निवडणुकीत होतोय तर निवडणूक आयोग पगार कसला घेतात? असा सवाल ठाकरेंनी उपस्थीत केलाय. ‘निवडणुकीचा आणि मतदार याद्यांचा घोळ थांबवला गेला पाहिजे, नाहीतर निवडणूक आयोगावर कारवाई झाली पाहिजे’ अशी मागणी ठाकरेंनी केली आहे.
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू

