जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर राम मुद्द्यावरून टीका केली. ते म्हणाले, "जो राम का नाही, वो किसी काम का नाही." फडणवीस यांनी नाशिकच्या विकासाची जबाबदारी भाजपवर असल्याचे सांगितले. कोविड काळात विरोधी नेते घरी असताना आपण नाशिकमध्ये सक्रिय होतो, असे सांगत त्यांनी विरोधकांना निवडणूक पर्यटक म्हटले.
नाशिक येथे एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाला वंदन करून भाषणाची सुरुवात केली आणि म्हणाले की, “काल-परवा दोन भाऊ (ठाकरे बंधू) नाशिकमध्ये आले, पण त्यांना रामाची आठवण झाली नाही. ज्यांच्यात राम उरला नाही, तो कोणत्याही कामाचा नाही.”
नाशिकच्या विकासाची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विरोधकांनी नाशिक दत्तक घेण्याच्या त्यांच्या भूमिकेवर केलेल्या टीकेला उत्तर देताना, फडणवीस यांनी कोविड-19 साथीच्या काळात आपण नाशिकमधील प्रत्येक कोविड केअर सेंटरला भेट दिल्याचे सांगितले, तर “उबाठा, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते.” विरोधकांना निवडणूक पर्यटक संबोधत, फडणवीस यांनी नाशिकसोबत आपले नाते कायमस्वरूपी असल्याचे स्पष्ट केले.
Published on: Jan 11, 2026 05:22 PM
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
