AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला

जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Jan 11, 2026 | 5:22 PM
Share

नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर राम मुद्द्यावरून टीका केली. ते म्हणाले, "जो राम का नाही, वो किसी काम का नाही." फडणवीस यांनी नाशिकच्या विकासाची जबाबदारी भाजपवर असल्याचे सांगितले. कोविड काळात विरोधी नेते घरी असताना आपण नाशिकमध्ये सक्रिय होतो, असे सांगत त्यांनी विरोधकांना निवडणूक पर्यटक म्हटले.

नाशिक येथे एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाला वंदन करून भाषणाची सुरुवात केली आणि म्हणाले की, “काल-परवा दोन भाऊ (ठाकरे बंधू) नाशिकमध्ये आले, पण त्यांना रामाची आठवण झाली नाही. ज्यांच्यात राम उरला नाही, तो कोणत्याही कामाचा नाही.”

नाशिकच्या विकासाची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विरोधकांनी नाशिक दत्तक घेण्याच्या त्यांच्या भूमिकेवर केलेल्या टीकेला उत्तर देताना, फडणवीस यांनी कोविड-19 साथीच्या काळात आपण नाशिकमधील प्रत्येक कोविड केअर सेंटरला भेट दिल्याचे सांगितले, तर “उबाठा, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते.” विरोधकांना निवडणूक पर्यटक संबोधत, फडणवीस यांनी नाशिकसोबत आपले नाते कायमस्वरूपी असल्याचे स्पष्ट केले.

Published on: Jan 11, 2026 05:22 PM

Follow Us
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा