AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय हालचालींना वेग, शिंदे गटाचे खासदार-आमदार यांची सुरक्षा का वाढवली?

शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेत वाढ झाल्याने पुन्हा एकदा राजकीय हालचाली तेजीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

राजकीय हालचालींना वेग, शिंदे गटाचे खासदार-आमदार यांची सुरक्षा का वाढवली?
संग्रहित छायाचित्र Image Credit source: social media
| Updated on: Oct 31, 2022 | 9:34 AM
Share

कृष्णा सोनरवाडकर, मुंबईः आमदार रवी राणांचे (Ravi Rana) आरोप, बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शिंदे-फडणवीसांसह राणांना दिलेलं आव्हान आणि आगामी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात प्रचंड राजकीय हालचाली सुरु आहेत. पडद्यावर दिसणाऱ्या प्रतिक्रियांतून एकमेकांबद्दल राग, नाराजी, धुसपूस दिसूनच येतेय. मात्र पडद्यामागेदेखील प्रचंड राजकीय खलबतं सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच घडामोडींमध्ये आज आणखी एक घडामोड म्हणजे शिंदे गटातील आमदार आणि खासदार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिंदे गटातील आमदार आणि खासदारांना X वरून Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेतही ही वाढ झाली आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने ही सुरक्षा प्रदान करण्यात येते.  राहुल शेवाळे यांच्यासह  11 खासदार तसेच 41 आमदारांसाठी पोलीस कर्मचारी आणि पोलीस व्हॅनची सुरक्षा अधिक देण्यात आली आहे.

याच राजकीय हालचालींमध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार पुन्हा एकदा गुवाहटीला जाण्याची चर्चा आहे. तर काहीजण अयोध्येलाही जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत राज्य सरकारतर्फे कपात करण्यात आली. यात उद्धव ठाकरे गटाचे आमदार, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांचाही समावेश आहे. मात्र आता सत्ताधारी शिंदे गटातील नेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

भाजपचे आमदार रवी राणा यांनी शिंदे गटातील आमदारांवर खोके अर्थात पैसे घेतल्याचा आरोप केलाय. यावरून शिंदे गट समर्थक आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यासह फडणवीस यांनाच आव्हान दिलंय. आम्ही पैसे घेतल्याचं सिद्ध करून दाखवा, राजीनामा देतो, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय.

एकिकडे आज रवी राणा- बच्चू कडू यांच्यातील वाद निवळण्याची शक्यता दिसून येतेय. काल रात्रीपासूनच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर या दोन्ही नेत्यांची बैठक सुरु आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना अपेक्षित स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

तर मात्र दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेत वाढ झाल्याने पुन्हा एकदा राजकीय हालचाली तेजीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.