मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत (rajya sabha election) भाजपने (BJP) सातवा उमेदवार देऊन महाविकास आघाडी सरकारचं टेन्शन वाढवलेलं असतानाच आता विधान परिषद निवडणुकीतही (Maharashtra Legislative Council) आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसत आहे. विधान परिषदेची पाचवी जागा भाजप लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीने चौथा उमेदवार मागे घेतला तर भाजप विधान परिषदेसाठी चारच उमेदवार देणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे विधान परिषदेत महाविकास आघाडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच राज्यसभेच्या निवडणुकीत कोणकोणाला पाडणार यावरूनही राजकारण तापलं आहे. तर राज्यसभेच्या निवडणुकीवरून पहायचं झाल्यास कोणत्या पक्षाचं किती आमदार आहेत यावरून उमेदवार निवडूण येणार हे कळतं. मात्र खरी टक्कर ही भाजप आणि शिवसेनेत पहायला मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली उर्वरीत मतं ही शिवसेनेला देणार असल्याचे आधीच सांगितलं आहे. तर मतांच्या घोड्याबाजारासाठी भाजपकडून छोटेपक्ष आणि अपक्षांचा आधार घेतला जाईल असे बोलले जात आहे. तर काय होणार या राज्यसभेच्या निवडणुकीत? भाजप, शिवसेनेसोबत किती अपक्ष ? जाणार हा स्पेशल रिपोर्ट