मतदानाच्या शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेपावर फडणवीसांचे प्रत्युत्तर
सॅनिटायजर लावल्यावर शाई जातेय असा आरोप ठाकरेंनी केलाय. पेनाची शाई लगेचच निघते अशी तक्रार अनेक लोकांनी केली आहे. मतदान केल्यानंतर लावलेली मार्कर पेनची शाई सहज पुसली जात असल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या या मार्कर शाईवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
मतदानानंतर शाईऐवजी पेनाचा आरोप केला जातो असा आरोप मनसे चे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी केलाय. सॅनिटायजर लावल्यावर शाई जातेय असा आरोप ठाकरेंनी केलाय. पेनाची शाई लगेचच निघते अशी तक्रार अनेक लोकांनी केली आहे. मतदान केल्यानंतर लावलेली मार्कर पेनची शाई सहज पुसली जात असल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या या मार्कर शाईवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी कामाला लागलंय अशी टीका ठाकरेंनी केली आहे.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय, लोकशाहीच्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अयोग्य आहे. विरोधक उद्याच्या निकालाच्या प्रभावाची तयारी आजपासूनच करत आहेत. पराभवाची स्क्रिप्ट ही विरोधकांकडून आधीच तयार आहेत असं फडणवीस म्हणाले.
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू

