संजय राऊत म्हणजे मुख्यमंत्र्यांचा भोंगा अशी टीका किरीट सोमय्या यांनी केला. सरकारातील हे जेव्हा आरोपी ठरतात, त्यामुळेच त्यांनी दगडफेक करणे, दंगा करणे अशी टीकाही किरीट सोमय्यांनी केली. तर महागाईवरुन लक्ष हटवण्यासाठी भोंगा प्रकरण उखरुन काढल्याची टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. सरकारविरोधात जेव्हा आम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढतो त्यावेळी सरकारची माणसं आमच्यावर हल्ला करतात, या प्रकरणांना वेगळं वळण लावण्याचा प्रकारही सरकारच्या माणसांकडून केला जातो अशी टीकाही त्यांनी केली.