मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच, पाहिजे या आग्रही मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. मराठा क्रांती मोर्चा आज मुंबईत धडकणार आहे. “आतापर्यंत आम्ही शांततेत खूप मोर्चे काढले, पण आता बस्स झालं. आता मर्यादा ओलंडल्या गेल्या आहेत. आम्ही आता थेट मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत. सरकारला जाब विचारणार आहोत”, असं मत मराठा आंदोलकांनी व्यक्त केलं.