केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) खोचक टीका केली आहे. आठ वर्षात मोदी सरकारने देश विकण्याशिवाय दुसरे कुठलेच काम केले नसल्याचे ते म्हणाले. आता तर पाऊस पडला नाही तर मोदींनी ढगही विकले की काय असा प्रश्न जनता विचारत असल्याचा टोला पटोले यांनी लगावला. ज्याप्रकारे देशातल्या सुरेक्षेसंबंधी आणि तरुणांची चेष्ठा करण्याचे काम सरकार करीत आहे. देशाच्या सुरक्षेबद्दल गंभीर नसलेल्या केंद्रसरकारचा धिक्कार विद्यार्थ्यांच्या वतीने होत असल्याचे दिसून येत आहे असेही पटोले म्हणाले. अग्निपथ योजनेबद्दल (agnipath scheme) त्यांनी तीव्र विरोध दर्शविला.