AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | जागावाटपावरून वाद पेटला; महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे, संजय राऊतांचा काँग्रेसला टोला, म्हणाले....

Sanjay Raut | जागावाटपावरून वाद पेटला; महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे, संजय राऊतांचा काँग्रेसला टोला, म्हणाले….

| Updated on: Apr 30, 2026 | 12:13 PM
Share

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत तणाव वाढल्याचे चित्र समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली असून, ठाकरे निवडणुकीत नसतील तर काँग्रेस स्वतःचा उमेदवार देईल, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत तणाव वाढल्याचे चित्र समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली असून, ठाकरे निवडणुकीत नसतील तर काँग्रेस स्वतःचा उमेदवार देईल, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली सकाळची पत्रकार परिषद चांगलीच चर्चेत राहिली. त्यांनी काँग्रेसवर थेट टीका करत, राष्ट्रीय पक्षाने प्रादेशिक पक्षांच्या हक्कांचा आदर करावा, असे स्पष्ट केले. “प्रत्येक वेळी काँग्रेसच्या मनात शंका असतात. राज्यसभेच्या वेळीही शरद पवार यांच्या नावावर त्यांनी शंका उपस्थित केली होती, पण शेवटी पाठिंबा दिला,” अशी आठवण त्यांनी करून दिली.
राऊत पुढे म्हणाले की, सध्याच्या संख्याबळानुसार जागांचे वाटप समन्वयाने करावे लागेल. “राज्यसभा शरद पवारांना मिळाली, विधान परिषद शिवसेनेला मिळाली, पुढील संधी काँग्रेसला दिली जाऊ शकते,” असे त्यांनी सूचित केले. तसेच, काँग्रेसने ‘आम्हाला काय मिळणार?’ असा प्रश्न विचारल्याचा उल्लेख करत, “आम्ही राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसच्या पाठीशी ठाम आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, संसदेत मांडण्यात आलेल्या डिलिमिटेशन विधेयकावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, “त्या वेळी आमच्या पक्षाचे खासदारही काँग्रेससोबत उभे होते,” अशी आठवण त्यांनी करून दिली. एकूणच, या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीत मतभेद उघड होत असून, आगामी काळात राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Published on: Apr 30, 2026 12:13 PM
Follow Us