मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. ठाकरेंच्या भाषणात वैचारिक पातळी नव्हती, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणता दम नाही. ते बोलायला उभं राहतात आणि लोक सभा सोडून निघून जातात, असं राणे म्हणालेत.