नवी मुंबई विमानतळाचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. विमानतळ एक आहे, मात्र त्याच्या नामकरणाबाबत चार वेगवेगळ्या मागण्या समोर येत आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही आहे. तर भाजप आणि नवी मुंबईतील भूमीपुत्र हे दि बा पाटील यांच्या नावाची मागणी करत आहेत. मनसेनं छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जे आर डी टाटा यांचं नाव देण्याचं मत मांडलं आहे. या प्रकरणावर सविस्तर माहिती सांगाणारा स्पेशल रिपोर्ट ! (Navi Mumbai Airport Naming Controversy Demanding).