मुंबई : राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. या आठवड्यात विरोधकांकडून राज्यातील अनेक प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न असणार आहे. प्रामुख्याने अवकाळीसह शेतमालाच्या हमीभाव मुद्दा असू शकतो. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकंल्प मांडतील. तर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तर शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या अशी मागणी विरोध पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे. आमच्या मित्रांना कोणीतरी भांग पाजली होती. नशा करण्यापेक्षा विरोधकांनी चांगली कामे करावी असा टोला फडणवीस यांनी लगावला.