त्यांची निराशा सुडाच्या राजकारणातून बाहेर येतेय - Devendra Fadnavis यांचे राज्यसरकारवर टीकास्त्र

त्यांची निराशा सुडाच्या राजकारणातून बाहेर येतेय – Devendra Fadnavis यांचे राज्यसरकारवर टीकास्त्र

| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 9:05 PM

सुडाचं राजकारण कोण करतंय हे दिसतंय. असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या टीकेलाही उत्तर दिलंय. नारायण राणेंना केलेली अटक. किरीट सोमय्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. रवी राणा यांच्याबाबत काही झालं तेही लोक पाहत आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना उत्तर दिलंय.

औरंगाबाद : ठाकरे सरकार हे मुंबईच्या मोठ्या इमारतीत हरवलं सरकार आहे. त्यांना सर्वसामान्यांशी काही घेणंदेणं नाही. यांचा दलाली खाण्याचाच धंदा आहे. रोज सकाळी उठायचं कोणत्याही विषयावर बोलायचं. नको त्याविषयावर पोपचपंची करायची. मात्र एखाद्या महत्वाच्या विषयावर कधी बोलायचं नाही. हेच या सरकारचे धोरण असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच सुडाचं राजकारण कोण करतंय हे दिसतंय. असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या टीकेलाही उत्तर दिलंय. नारायण राणेंना केलेली अटक. किरीट सोमय्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. रवी राणा यांच्याबाबत काही झालं तेही लोक पाहत आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना उत्तर दिलंय.

Follow Us