भाजपसोबत खटके उडाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची ठाकरे सरकारशी जवळीक वाढली. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनापासून दूर होती. पण आता राजू शेट्टी यांनी पुन्हा आंदोलनाची वाट धरली आहे. पूरग्रस्तांच्या वाढीव मदतीसाठी आंदोलन करुन त्यांनी पुन्हा महाराष्ट्राचं लक्ष स्वत:कडे वेधलं आहे. याप्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !