Mumbai | भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्यांना वाचवण्याचा मुंबई पालिकेचा प्रयत्न, रवी राजा यांचा आरोप

| Updated on: Sep 17, 2021 | 1:31 AM

: निकृष्ट कामाला वाव देणाऱ्या आणि कामांत अनियमितता करुन भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेडून वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

Follow us on
मुंबई : निकृष्ट कामाला वाव देणाऱ्या आणि कामांत अनियमितता करुन भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेडून वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. पालिकेकडून अनियमितता केलेल्या दोषी अधिकारी तसेच अभियंत्यांना नाममात्र दंड दिला जातोय. दोषी अभियंत्यांना केवळ 1500 ते 4000 रुपयांच्या वेतनकपातीची शिक्षा दिली गेली आहे. त्यामुळे दोषींच्या शिक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेत्यांकडून केली जात आहे.