राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मागच्या काही दिवसांपासून रखडला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. सर्वच आमदारांना मंत्रिपद हवं आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. सगळ्यांनाच मंत्रिपद कसं मिळेल? सरकार हे केवळ त्यांच्या समर्थक आमदारांसाठी नसतं. तर जनतेसाठी असतं, असं रोहित पवार म्हणालेत.