Breaking | संभाजीराजेंचं महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदारांना खुलं पत्र

| Updated on: May 17, 2022 | 8:54 PM

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. आता संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व आमदारांना खुलं पत्र लिहिलं आहे.

Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. यातील 5 जांपैकी भाजपच्या दोन आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची प्रत्येकी एक जागा निवडून येईल असं संख्याबळ आहे. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. आता संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व आमदारांना (Assembly MLA) खुलं पत्र लिहिलं आहे. ‘राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे. माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो’, असं संभाजीराजे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.