औरंगाबाद नामांतराच्या मुद्दावर संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले बघा

| Updated on: Feb 19, 2023 | 9:47 PM

VIDEO | औरंगाबाद नामांतराच्या मुद्दावर शिंदे गटातील नेते संदीपान भुमरे काय म्हणताय बघा व्हिडीओ

Follow us on

नवी दिल्ली : औरंगाबाद नामांतराच्या मुद्दावर शिंदे गटातील नेते संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादचे नाव हे छत्रपती संभाजी नगर होणार याची शंभर टक्के खात्री असल्याचा विश्वास संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, औरंगाबादचे नाव हे छत्रपती संभाजी नगर होणार याची शंभर टक्के होणार असल्याने औरंगाबादचे नाव संभाजीनगर होण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचेही संदीपान भुमरे यांनी म्हटले आहे. देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना यंदा पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्रा शहरात साजरी करण्यात आली. यावेळी संदीपान भुमरे, हरिभाऊ बागडे, आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय शिरसाठ आणि आमदार प्रशांत बंब हेही सहभागी झाले होते. यावेळी संदीपान भुमरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.