India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि चीनमध्ये सात महत्त्वाचे करार झाले. हे करार दोन्ही देशांमधील संबंधांना रणनीतिक आणि दीर्घकालीन स्वरूप देतील, सीमावादावर तोडगा काढतील, आर्थिक संबंध वाढवतील आणि जागतिक आव्हानांवर सहकार्य करतील.
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये सात महत्त्वाचे करार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या बैठकीत हे महत्त्वपूर्ण करार निश्चित करण्यात आले. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. या करारांनुसार, भारत आणि चीन परस्पर संबंधांकडे रणनीतिक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहतील. दोन्ही देश सीमा आणि इतर विषयांवरील मतभेदांचे रूपांतर वादात होऊ देणार नाहीत.
सीमावादावर निष्पक्ष, न्याय आणि दोन्ही देशांना मान्य असेल असा तोडगा शोधला जाईल यावर भर देण्यात आला आहे. आर्थिक, व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधांना अधिक गती दिली जाईल. तसेच, दोन्ही देशांमधील नागरिकांमधील परस्पर संपर्क वाढवला जाईल. व्यापार संतुलनाबाबत असलेल्या आर्थिक चिंतांवर एकत्र काम केले जाईल आणि प्रादेशिक तसेच जागतिक पातळीवरील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सहकार्य वाढवले जाईल. मोदी आणि जिनपिंग यांच्यात भारत-चीन संबंधांवर देखील चर्चा झाली, ज्यामुळे या करारांचे महत्त्व अधोरेखित होते.
