AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : यांचं कर्तृत्व काय? 5-5 कोटींच्या बॅगा घरपोच, बिनविरोध निवडणुकांवर प्रश्नचिन्ह अन् राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : यांचं कर्तृत्व काय? 5-5 कोटींच्या बॅगा घरपोच, बिनविरोध निवडणुकांवर प्रश्नचिन्ह अन् राऊतांचा गंभीर आरोप

| Updated on: Jan 03, 2026 | 12:34 PM
Share

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील बिनविरोध स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 5 ते 10 कोटी रुपये दिल्याचा दावा त्यांनी केला. जलगावमध्ये 5 कोटींच्या बॅगा पोहोचल्याचे ते म्हणाले. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करतानाच राऊत यांनी अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावरही फडणवीसांकडून उत्तर मागितले.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिनविरोध निवडणुका आणि सिंचन घोटाळ्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला असून, उमेदवारांनी माघार का घेतली आणि त्यावर काही दबाव होता का, अशी विचारणा केली आहे. राऊत यांनी आरोप केला की, बिनविरोध होण्यासाठी उमेदवारांना 5 ते 10 कोटी रुपये दिले गेले.

जळगावमध्ये उमेदवारांना माघार घेण्यासाठी 5-5 कोटींच्या बॅगा घरपोच पोहोचल्याचा दावा राऊतांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून निवडणूक अधिकाऱ्यांना माघारीची वेळ उलटूनही अर्ज स्वीकारण्यास सांगितले जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. याशिवाय, राऊत यांनी अजित पवारांच्या 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणावरही भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केलेल्या या घोटाळ्याचे पुढे काय झाले, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Published on: Jan 03, 2026 12:33 PM