औरंगाबाद – शिवसैनिक एवढे कट्टर आहेत की त्यांना तुम्ही आव्हान देऊ नका. तुम्ही त्यांना चॅलेंज केलंतर ते काही करू शकतात असे मत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी व्यक्त केले आहेत. यापूर्वी औरंगाबादमध्ये याच मैदानावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचीही सभा झाली. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकारे (Chief Minister Uddhav Thackeray)यांची आज सभा होणार आहे. तसेच शिवसैनिकसंपर्क अभियान दोन तसेच या शाखेचा वर्धापन दिनही आहे.या सगळ्याबरोबरच गेल्या पावणेतीन वर्षात सरकारम्हणून आम्ही काय केलं आहे. औरंगाबादाच्या (Aurangabad)नामकरणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय आहे. हे सांगू शकत नाहीत.मात्र आमच्यासाठी हे संभाजीनगरच आहेत.