राज्यसभेच्या तिसऱ्या जागेबाबतचे राजकारण आता चांगलेच तापले आहे. त्यामुळे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे की, केंद्र सरकारने जर आम्हाला आदेश दिला तर आम्ही तिसरी जागाही लढू आणि ती जिंकून आणूच. त्यामुळे तिसऱ्या जागेचे राजकारण अधिकच तापले आहे. तर दुसरी संजय राऊत यांनी म्हटले आहे की, भाजप तिसरी जागा देऊ देत, चौथी देऊ किंवा अन्य काही जागा देऊ देत आम्ही या सगळ्या जागा लढवण्यास तयारच आहोत. त्यामुळे भाजपकडून ईडीची धमकी दाखवून जर राजकारण करत असतील तर खुशाल करु देत त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही.