बाळासाहेब ठाकरे यांचे निकटचे सहकारी म्हणून सुधीर जोशी यांनी ओळखले जात होते. त्यांनी तरू वयात असतानाच महापौर पद भूषविले होते, त्यांनीच मुंबईची प्रतिमा कशी असावी याचा पायंडा घालून दिला. सुधीर जोशी यांनी ज्याप्रकारे शिवसेनेच त्यांनी काम केले आहे, त्याच प्रकार शिवसेनेचे सरकार असताना त्यांनी मंत्रीपदही भूषविली आहेत. त्यामुळे त्यांचे नेहमीच शिवसेना पक्षाला मार्गदर्शन मिळत राहिले आहे. शिवसेनेच्या अनेक आंदोलनातून त्यांनी सक्रिय राहून शिवसेनेची भूमिका मांडली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यांनी सुधीरभाऊ जोशी यांच्या जाण्यामुळे शिवसेनेची आम्ही तळपती तलवार गमावली असल्याची भावना व्यक्त केली.