गोव्यात निवडणुकांचे वातावरण आहे. आता तृणमूलच्या खांद्यावर बसून भाजपला गोवा पुन्हा जिंकायचे आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तृणमूल कॉग्रेस व आपसारखे पक्ष गोव्यात येऊन पैशांचा वारेमाप वापर करतात.
गोव्याची संस्कृती आणि पर्यावरण आधीच बिघडले. त्यात पैश्याचा पाऊस सूरू झाल्याने सगळेच बिघडलेय, असं संजय राऊत म्हणाले. आप आणि टीएमसीच्या पैशाचा धनी कोण आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.