Anna Bhau Sathe | दीड दिवसात शाळा का सोडली? जाणून घ्या अण्णा भाऊ साठे यांच्या आयुष्यातील खास गोष्टी

| Updated on: Aug 01, 2021 | 9:01 PM

पोथी वाचणाऱ्याकडून मुळाक्षरांची ओळख करुन घेणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांनी तब्बल 35 कादंबऱ्या, 14 तमाशा, 13 कथासंग्रह, 12 पटकथा, 10 पोवाडे, 3 नाटकं, 1 प्रवास वर्णन, 1 शाहिरी पुस्तक लिहिले.

Follow us on

Anna Bhau Sathe : जातीभेदाचे बळी ठरल्यानं अण्णाभाऊ साठे यांना केवळ दीड दिवसातच शाळा सोडावी लागली. मात्र, हे औपचारिक शिक्षण त्यांच्या साहित्यिक म्हणून प्रवासात अडचण ठरलं नाही. पोथी वाचणाऱ्याकडून मुळाक्षरांची ओळख करुन घेणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांनी तब्बल 35 कादंबऱ्या, 14 तमाशा, 13 कथासंग्रह, 12 पटकथा, 10 पोवाडे, 3 नाटकं, 1 प्रवास वर्णन, 1 शाहिरी पुस्तक लिहिले. त्यांच्या 35 पैकी 7 कादंबऱ्यांवर चित्रपट, 2 राष्ट्रीय पुरस्कार, 2 राज्य पुरस्कार मिळाले. त्यामुळेच त्यांची ओळख लोकशाहीर, लोकसाहित्यिक, साहित्यरत्न अशी झाली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन प्रवासाचा हा खास धांडोळा. | Special interview of Prof Tulshiram Jadhav on life of Anna Bhau Sathe