मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासास मुभा देण्यात आलीय. दरम्यान सामान्य नागरिकांनाही प्रवासासाठी बाहेर पडावे लागत आहे. अशात अनेकजण खोटं ओळखपत्र वापरुन प्रवास करत असल्याचं उघड झालंय. लोकलबाबत अजूनही कोणता निर्णय राज्य सरकारने घेतला नसल्याने त्यामुळे अजूनही सामान्यांसाठी लोकल प्रवास बंदच असणार आहे.