आज सर्वोच्छ न्यायालयाने 12 आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर भाजपकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारवरती भाजपकडून टीका केली जात आहे. आमदारांच्या निलंबनाचा निर्णय सरकारचा नसून सभागृहाचा असल्याचा वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसेत आमदारांचं निलंबन जाणूनबुजुन झालेलं नाही असं वळसे पाटील यांनी म्हणटलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवरती जोरदार टीका केली होती. परंतु त्यावर अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.