मनसेला मतदान करणारा ‘मराठी माणूस’ शिवसेनेकडे!

भांडुप पश्चिम, मागाठणे, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, शिवडी, वरळी, माहिम या आठ मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांचं प्राबल्य आहे. कोणे एके काळी मनसे उमेदवारांना मत देणाऱ्या या भागांनी यावेळी शिवसेनेचे आमदार निवडून आणले आहेत.

मनसेला मतदान करणारा 'मराठी माणूस' शिवसेनेकडे!
Follow us
| Updated on: Oct 29, 2019 | 10:39 AM

मुंबई : मुंबईतील मराठी मतदारांवर मनसेच्या तुलनेत शिवसेनेचा प्रभाव अधिक असल्याचं विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन स्पष्ट झालं आहे. मराठीबहुल भागातील मतदारांनीही मनसेपेक्षा शिवसेनेला पसंती दिल्याचं मतदानाच्या आकडेवारीमध्ये (Marathi Voters choose Shivsena over MNS) पाहायला मिळत आहे.

शिवसेनेने मुंबईत विधानसभेच्या 14 जागा जिंकल्या. यापैकी भांडुप पश्चिम, मागाठणे, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, शिवडी, वरळी, माहिम या आठ मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांचं प्राबल्य आहे. हे आठही मतदारसंघ 2009 मधील विधानसभा निवडणुकीत मनसेने जिंकले होते. परंतु, यावेळी मनसेचा पर्याय असतानाही मतदारांनी शिवसेना उमेदवारांना निवडून दिलं आहे. भांडुप पश्चिममध्ये तर मुंबईतील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती.

विशेष म्हणजे या मतदारसंघांत सेना उमेदवारांना 20 हजार ते 67 हजार या दरम्यान मताधिक्य मिळालं आहे. काँग्रेस-भाजपसारख्या पक्षांवरुन मराठी मतदारांचा विश्वास उडाल्यामुळे शिवसेनेला पसंती मिळत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

मतदारसंघ – शिवसेना आमदार – मताधिक्य

वरळी – आदित्य ठाकरे – 67 हजार 427 (मनसे उमेदवार नाही) जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर – 58 हजार 787 (मनसे उमेदवार नाही) मागाठणे – प्रकाश सुर्वे – 49 हजार 146 (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे नयन कदम (41 हजार 015 मतं) दिंडोशी – सुनिल प्रभू – 44 हजार 511 (तिसऱ्या क्रमांकावर मनसेचे अरुण सुर्वे (25 हजार 834 मतं) शिवडी – अजय चौधरी – 39 हजार 330 (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे संतोष नलावडे (38 हजार 350 मतं) भांडुप पश्चिम – रमेश कोरगांवकर – 29 हजार 173 (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे संदीप जळगावकर (42 हजार 782 मतं) विक्रोळी – सुनिल राऊत – 27 हजार 841 (तिसऱ्या क्रमांकावर मनसेचे विनोद शिंदे (16 हजार 008 मतं) माहिम – सदा सरवणकर – 18 हजार 647 (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे संदीप देशपांडे (42 हजार 690 मतं)

शिवसेनेने भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या मूळ मुद्द्यापासून काहीशी फारकत घेत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केलेला असला, तरी मराठी मतदारांनी मनसेच्या तुलनेत शिवसेनेलाच पसंती (Marathi Voters choose Shivsena over MNS) दिल्याचं दिसत आहे.

मनसेच्या एकमेव आमदाराला खुद्द राज ठाकरेंकडून खुर्चीची ऑफर

गुजराती समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार असल्यामुळे मराठी माणूस शिवसेनेला पसंती देत आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुंबईत फारशी चमक दाखवता आलेली नाही. शिवसेनेने आपल्या मूळ मुद्द्याला बगल दिल्यानंतर मनसे मराठी मतदारांना आकृष्ट करण्यात अपयशी ठरल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात.

14 पैकी ज्या उर्वरित सहा मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांचं प्रमाण कमी आहे, तिथेही शिवसेनेने चांगलं मताधिक्य घेतलं आहे. त्यामुळे कोणे एके काळी मनसेची निवड करणारे मराठी मतदार (Marathi Voters choose Shivsena over MNS) पुन्हा शिवसेनेकडे वळल्याचं चित्र आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.