शरद पवारांमुळे पाठिंब्याचं पत्र देण्यास उशिर, माणिकराव ठाकरेंचा दावा

शरद पवारांनी चर्चेसाठी दोन दिवस थांबण्याची विनंती सोनिया गांधी यांना केल्यामुळे सरकार स्थापना पुढे ढकलली

शरद पवारांमुळे पाठिंब्याचं पत्र देण्यास उशिर, माणिकराव ठाकरेंचा दावा
काही महिन्यांपूर्वी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढलेल्या आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती.
Follow us
| Updated on: Nov 12, 2019 | 9:52 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘किंगमेकर’ म्हटलं जातं, त्यात काही वावगं नाही. शरद पवारांनी काँग्रेससोबतची चर्चा पुढे ढकलल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महासेनाआघाडी सरकार लांबणीवर पडल्याचं चित्र आहे. शरद पवार यांनी चर्चेसाठी आणखी दोन दिवस थांबण्याची विनंती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना (Sharad Pawar stopped Congress from Supporting) केल्यामुळे सरकार स्थापना पुढे ढकलली गेली. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला या संदर्भात माहिती दिली. त्यामुळे चेंडू आता राष्ट्रवादीच्या कोर्टात आला आहे.

‘काँग्रेस कार्यकारिणीची काल दिल्लीत बैठक झाली. नेमकं काय करावं? याचा निर्णय होत नव्हता. महाराष्ट्रातील नेत्यांसोबत सोनिया गांधींनी तीन तास चर्चा केली. त्यानंतर शरद पवारांशीही त्या बोलल्या. दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज चर्चा करु, गरज पडल्यास शिवसेनेशीही चर्चा करु, असं पवारांनी सांगितल्याची माहिती माणिकराव ठाकरेंनी दिली.

‘आम्ही तयारीत होतो, पण पवारांनी सूचित केल्यामुळे अंतिम निर्णय घेतला नाही. पवारांनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीतील नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल आज मुंबईला जाणार होते. परंतु आजच्या ऐवजी परवा भेटू, असं नंतर पवारांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसचे दिल्लीतील नेते आज शरद पवारांची भेट घेणार नाहीत’, असं माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

खातेवाटप आणि भागीदारीमुळे काँग्रेसचं शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र नाही?

दरम्यान, राष्ट्रवादीला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलेलं आहे. राष्ट्रवादीकडे आज रात्री 8.30 वाजेपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्याची मुदत आहे. राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शिवसेना यांचा पाठिंबा मिळवून आकड्यांची जुळवाजुळव करण्यास यश आलं, तर राष्ट्रवादीच्या नेतृत्वात ‘महासेनाआघाडी’ सरकार राज्यात स्थापन होऊ शकतं.

शिवसेनेला काल राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करताना संख्याबळ दाखवता आलं असतं, तर स्थापन झालेल्या ‘महासेनाआघाडी’ सरकारवर शिवसेनेचा वरचष्मा असता. मात्र नेतृत्व स्वतःकडे खेचून घेण्यासाठी शरद पवारांनी लढवलेली शक्कल त्यांच्या राजकीय अनुभवाची चुणूक दाखवणारी (Sharad Pawar stopped Congress from Supporting) आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.